Thursday, October 16, 2008

एक दीवस

एक दीवस असा येइल,
मज्याकडे भरपूर कामं असतील.
एक दीवस असा येइल,
मला अमाप फायदा होइल.
एक दीवस असा येइल,
मी खूप-खूप आनंदी असेन.
मी माझी सगळी कर्तव्य,
पार पडलेली असतील.
एक दीवस असा येइल,
हे सगल, सर्वस्व इथे असेल,
पण मीच नसेन.......

*********** मी ***********

मी असा फुलून आलो,
जेव्हा तू बहार झालीस,
कधी चांदणे तू व्हावे,
अन मी ते पांघरावे.


मी असा मोहरून गेलो,
जेव्हा तू सुगंध झालीस,
कधी पाउस गाणे तू व्हावे,
अन मी वाहत जावे.

भीजल्या भावनांना स्पर्शावे,
कधी मी सारे वीसरावे,
अन तू आठवावे.

Tuesday, September 16, 2008

नाती !!!

मनाच्या जीवलग नाती;
ज्या देतात जीवनाला गती;
नसतात त्यांना कुठल्याही अटी;
ते जगतात फक्त प्रेमापोटी।

ऊन पावसाच्या भेटी

ऊन पावसाच्या भेटी,
झाल्या मनी ह्या श्रावन्मासी,
तू का जलधारा झालीस होती.

चींब चींब झाले स्वपन्,
भीजला हीरवा रंग,
तू का ऊशीरा आलीस होती.
माल पकश्यांची गगनात हींदोलते,
तीन्ही सांजेला...
तुझ्या आठवणींची गर्दी होते.
हीरवे मन, हीरवा चूडा,
हीरवे स्वप्न, हीरवा जीव्हाला,
रान फुलांची, गडद रंगाची,
कीनार कडा, तर कुठे मधेच पुंजका,
ओल्या वार्यावर, तेवतो जसा स्वप्न दीवा.

Monday, September 15, 2008

तू नसतेस तेव्हा...

तू नसतेस तेव्हा बऱ्याच,
गोष्टींची कमतरता जाणवते.
तू हवी-हवीशी वातन्यासाठी,
तू काही काळ जवळ,
नसावीस वाटते.
तूझी उणीव, 'आठवणी',
भरून काढायचा प्रयत्न करतात
मात्र 'आठवणी' मनासारख्या वागतात,
त्यामुले रुसव्या-फुगव्या पासून,
वंचीत झाल्या सारखे वाटते.

तू नसतेस तेव्हा...

Thursday, September 11, 2008

तू...

सतत जवळ नसल्यामुळे,
आकर्षक तू...
क्षन्भारासाठी समजून घेणारी तू...
केव्हा तरीच्या मुलाखातीत,
फुलणारी तू...


माज्या बाबतीत 'तेच'
अनुभव भोगनारी तू...
प्रत्यक्षात नवरा-बायको
झाल्यावर, रुसणारी तू...
रागावणारी तू...
सतत हुतू-तू... खेलनारी,
मी आणी तू...
आयुष्याच्या लांब प्रवासाला,
नीघनारे मी तीथे तू...
कींवा तू तीथे मी...

Friday, September 5, 2008

मराठी साहीत्य


अजून एक आठवण
वीसरयाची म्हणून न जपलेली
अशीच एक वेदना
समजुतदारपणे झोपलेली

अशी एक रात्र हवी
ज्याला पहाट जोडलेली नाही
अश्क्यातील गोष्ट आहे
पण मी आशा सोडलेली नाही.

सगळ तुला देऊन पुन्हा
माजी ओंन्जल भरलेली
पाहील तर तू तुजे ओंन्जल
माज्या ओन्न्जलीत धरलेली.

तरसन्याचा अनुभव मी
आभाळ बरसताना घेतला
तू नव्हतीस तर प्रत्येक थेंब
माज्या अंगोपांगी रूतला

आता मलाही जमायला लागलय
तुज्यासारख वागणं
समोर असल की गप्प राहण
रात्री कुढत जागण.

जेव्हा तू माज़ा
अलगद हात धरलास
खर सांग तेव्हा तुज्याजवल
तू कीतीसा उरलास?
पुसणार कोनी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरणसुध्हा व्यर्थ आहे.

Friday, August 29, 2008

काही ओळी

१) माणसे दूर जातात... तेच नैसर्गीक? त्या नीसर्गक्र्मात अधीक जवळ येणे ही प्रक्रीयाच नाही? जीव गर्भाशयातुन बाहेर पडतो; नाळ तुटते; आणी मग पुढील आयुष्यात एक अदृश्य नाळ पुन्हा पुन्हा तुटत राहते...... कधी वेदना जाणवतात, कधी जाणवत नाहीत. पण त्या मानत रुजलेल्या असतातच.

२) आठवणींचा खड़ा पहरा असेल तर स्वताच्या आयुष्यात कसे शीरायचे?

३) पुढे जायच असेल तर इतक पुढे जाव की मागच काही दीसूच नये.

४) "आणखी काय हव?" म्हणजे "आणखी कही नको आहे" अस नव्हे तर "आणखी काहीतरी नक्कीच हव" अस उत्तर त्या प्रश्नातुन ध्वनीत होते.

५) "शांती" तुमच्या आत असते. ती काही एखादी भेट म्हणून तुम्हाला कोणी आणून देत नाही. शोध घ्या.... घेत राहा....

६) खरा न्याय इतरांच्या परभावत नसतो. तो कुणावर वीसंबन्याताही नसतो. तो असतो जे घडते आहे त्याला धीराने सामोरे जाण्यात. स्वतावर वीश्वास ठेवून, मनातील आशा जागी ठेवून पुढे जाण्यात.

७) "मैत्री" कशी वाहत्या झ्र्यासाराखी पाहीजे. तीच्यात न्हाताना स्वच्छ, प्रसन्न वाटल पाहीजे.

Monday, August 25, 2008

$$$$$ दोन गुलाब $$$$$

आमच्या घरी दोन प्रकारची गुलाबाची झाडे आहेत. एक मी पसंद केलेल आणी एक त्याने पसंद केलेल. दोनही झाडांना अगदी छान भरपूर फूले येतात. जेव्हा पहील्यांदा त्याने मला ही फुलझाडे घेउन दीली तेव्हा मी मनात म्हटले की ही झाडे जगली, जर या झाडांना बहर आला तरच मी समजेन की आमचे नाते शुद्ध, नीतल आणी पवीत्र आहे. आणी अगदी तसेच झाले. फुलझाडे फुलली, त्यांना बहर आला. सुंदर सुंदर फूले त्याला आली. जणू त्याच्या माज्या मैत्रीच्या झाडाला आलेली प्रेमाचीच फूले ती !!!
त्या वेगवेगल्या दोन झाडांच्या फुलांचे नीट नीरीक्षण केले असता कलुन येते की ती फूले त्याचा माझा स्वभाव वर्णन करीत आहेत. मी पसंद केलेल्या झाडाला जेव्हा कली येते तेव्हा त्या कलीचा रंग हलकासा पीवला असतो. मग त्या कलीचे फुलत रूपांतर होताना त्याचा रंग गडद पीवला होतो. त्यानंतर ते फुल जेव्हा पूर्णपणे वीकसीत होते तेव्हा त्याला गुलाबी रंग चढू लागतो. मग दोन दीवसांनी पीवला रंग पूर्णपणे नाहीसा होउन त्याला संपूर्ण गुलाबी रंग येतो. आणी मग आणखी दोन दीवसांनी त्याला लाल रंग चढू लागतो. शेवटी जेव्हा ते फुल पुर्णतः फुलून, त्याचा सुगंध सर्वांना देऊन गलन्याच्या मार्गावर असते तेव्हा त्याला लाल रंग उरतो. इथेच त्या फुलाचा शेवट होतो.
त्याने पसंद केलेल्या झाडाच्या फुलला सुरुवातीपासुनच गुलाबी मोहक फूले येतात. त्या फुलांना नंतर लाल रंग चढू लागतो. शेवटी त्या फुलांचाही संपूर्ण रंग लाला होतो.
मैत्रीचे प्रतीक असलेले पीवले गुलाब, प्रेमाची हलकीशी जाणीव करून देणारे गुलाबी गुलाब अतीव, नीर्मल, शुद्ध प्रेम जपणारे सुंदर लाल गुलाब हा सारा तर माझ्या जीवनाचा प्रवास आहे. उलट प्रेमापासून सुरू होउन प्रेमाच्या उंच शीखरापर्यंत जाणारा त्याचा जीवनप्रवास.

ती फूले आम्हा दोघांनाही पूरक आहेत.

Friday, August 22, 2008

प्रेमाचे बंध !!!

सज्ज आहेत आई बाबा,
माज्या लग्नाचा बार उद्वायाला,
आता तरी ये मनराजा,
लावू नको वाट पहायला.



पाहीली वाट तूजी कीती,
झाले आता मी परकी,
नकळत येता आठवण तुज़ी,
येतो एक प्रश्नमनी.

काय होते कारण तुज्या येण्याला?
वीचारून थकले वेड्या मनाला,
सांग परी मनराजा,
का दीलास दगा मला?

वीसरालास का त्या आणा-भाका,
घेतल्या होत्या आपण द्होघा,
'मरके भी कभी होंगे जुदा'
राहू एकमेकांच्या हृदयात सदा.

आहे हे वीसराने कठीन,
पण तरीही प्रयत्न करेन,
तूला मनातून काढून,
त्यांना हृदयात ठेवीन.

केले त्यांनी मला पत्नी,
झालो सात जन्माचे साथी,
होणार नाही मी तुझी,
कदाचीत आठव्याही जन्मी.

ठावूक असुनही सर्व काही,
दीला प्रेमाचा सागर त्यांनी,
पुर्त न्हाले मी त्यातुनी,
झाले मी त्यांची ऋणी......